प्रेम म्हणजे काय असतं?
पहाटेच्या दवबिंदुसारख
नकळतपणे,गुपचूप
हळूच आपल्या आयुष्यात येत
मनाच्या पानाचा स्पर्श होताच
सुंदर असा मोती बनत
काही पानं मोती धरून ठेवतात
त्यांना त्यांची किंमत कळते
काही पानं अळूच्या पानासारखी
मोती ओघळून टाकतात
आणि त्यांना मातीमोल करतात
No comments:
Post a Comment