मला काही दिवसांपूर्वी
तुझ्या अस्तित्वाचा आभास झाला होता
पण तो आभासच होता
हे आता काहीसं उमजू लागलंय
सत्य नेहमीच कटू असत
हे आता समजू लागलंय
कटू सत्य हेच आहे कि
सच्च्या मनाने काही करावे
तर ते लोकांना खोटे वाटते
आणि खोटे मोठ्याने ओरडून सांगावे
तर ते काही वेळाने खरे बनते
सत्य हेच कि घोर कलियुग आहे
कलियुगात माझा प्रभाव अत्यंत कमी असेल
असं तू स्वतः म्हणाला होतास
मग खोट्या आशा देऊन काय सिद्ध करतोयस?
कि जे तू सत्ययुगात म्हणालास ते खरं आहे?
कि तू खोट्या कलियुगात
स्वतःहि खोटारडा बनला आहेस?
No comments:
Post a Comment